Home / हवामान / Alert! महाराष्ट्रात मुसळधार अवकाळी पाऊस – 31 March ते 7 April हवामान इशारा | शेतकऱ्यांसाठी तातडीची माहिती आणि संरक्षण उपाय

Alert! महाराष्ट्रात मुसळधार अवकाळी पाऊस – 31 March ते 7 April हवामान इशारा | शेतकऱ्यांसाठी तातडीची माहिती आणि संरक्षण उपाय

अवकाळी पाऊस

Alert! महाराष्ट्रात मुसळधार अवकाळी पाऊस – 31 March ते 7 April हवामान इशारा | शेतकऱ्यांसाठी तातडीची माहिती आणि संरक्षण उपाय

महाराष्ट्रात ३१ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस चा अंदाज. शेतकऱ्यांनी गहू, कांदा, ज्वारी आणि आंबा पिकांसाठी योग्य ती काळजी घ्यावी. संपूर्ण अपडेट मिळवा!

Table of Contents

अवकाळी पाऊस चा ७ दिवसांचा अंदाज:

२६ मार्चपासून हवामान बदलले आहे, धुकट वातावरण वाढले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३१ मार्च ते ७ एप्रिल महाराष्ट्रातील अनेक भागांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे हवामान स्त्रोत:

Alert! महाराष्ट्रात मुसळधार अवकाळी पाऊस – 31 March ते 7 April हवामान इशारा | शेतकऱ्यांसाठी तातडीची माहिती आणि संरक्षण उपाय

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे उपाय

अवकाळी पावसाचा धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी तातडीने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम, गहू, कांदा, ज्वारी आणि चाऱ्यासारखी पीके लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणे आवश्यक आहे. कांदा साठवताना त्याला योग्य हवा मिळेल याची काळजी घ्या, अन्यथा नमीमुळे कांद्याचे नुकसान होऊ शकते. पावसामुळे शेतमाल भिजल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, म्हणून काढणीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे गरजेचे आहे.

फळपिकांबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः आंबा बागायतदारांनी झाडांना ट्रॅक्टर पट्टा, जाळी किंवा प्लास्टिक कव्हर लावून संरक्षण द्यावे. अवकाळी पावसामुळे आंब्याची फळगळ होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे योग्य कीडनाशके व बुरशीनाशके फवारणी करणे गरजेचे आहे. संत्री, केळी आणि डाळिंब यांसारख्या इतर फळपिकांनाही अति पावसामुळे फळगळ किंवा झाडांच्या मुळांना फंगल संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल याची दक्षता घ्या.

अवकाळी पावसामुळे जमिनीत अतिरिक्त ओलावा साचू नये म्हणून शेतकऱ्यांनी शेतीच्या कडेला चर तयार करावेत, जेणेकरून पाणी वेगाने निघून जाईल आणि मुळांना अतिरिक्त ओलाव्याचा त्रास होणार नाही. तसेच, वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि गुरेढोरे मोकळ्या मैदानात थांबू नयेत. पावसाच्या वेळी उंच झाडांखाली किंवा लोखंडी वस्तूंजवळ थांबणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे योग्य सुरक्षिततेची काळजी घ्यावी. अशा परिस्थितीत हवामान खात्याच्या सततच्या अपडेट्सवर लक्ष ठेऊन, संभाव्य संकट टाळण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करावेत.
अधिक माहितीसाठी आमचे हवामानविषयक लेख वाचा.

अवकाळी पावसाचे फायदे

अवकाळी पाऊस हा शेतीसाठी संमिश्र परिणाम करणारा असतो. काही ठिकाणी तो फायदेशीर ठरतो, तर काही ठिकाणी मोठे नुकसान करतो. अवकाळी पावसामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो, ज्याचा फायदा उन्हाळी पिकांना होतो. कमी पाण्यावर वाढणाऱ्या भुईमूग, मूग, मका यांसारख्या पिकांसाठी हलकासा पाऊस उपयुक्त ठरू शकतो. तसेच, तापमान कमी झाल्यास काही झाडांना उष्णतेपासून संरक्षण मिळते.

अवकाळी पावसाचे तोटे

अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कांदा यांसारख्या काढणीस तयार असलेल्या पिकांचे मोठे नुकसान होते. गारपिटीमुळे आंबा, संत्री यांसारख्या फळपिकांची फळगळ वाढते आणि उत्पादन घटते. वाढलेल्या आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोग व कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे, शेतकऱ्यांनी हवामान अंदाजावर लक्ष ठेवून योग्य सुरक्षात्मक उपाय करणे गरजेचे आहे.

Alert! महाराष्ट्रात मुसळधार अवकाळी पाऊस – 31 March ते 7 April हवामान इशारा | शेतकऱ्यांसाठी तातडीची माहिती आणि संरक्षण उपाय

अवकाळी पाऊस पासूण संरक्षण घेण्याच्या उपाययोजना:

  1. पिकांचे संरक्षण:
    • जास्त पाऊस झाल्यास पाणी साचू नये म्हणून योग्य निचरा प्रणाली तयार करा.
    • उंच सरी व वरंबे पद्धत अवलंबा.
    • भुईमूग, हरभरा यांसारख्या पिकांना खत आणि बुरशीनाशक फवारणी करून संरक्षण द्या.
  2. फळबागांची काळजी:
    • झाडांना आधार देऊन त्यांना पडण्यापासून वाचवा.
    • जास्त पाणी झाडाच्या मुळाशी साचू नये म्हणून त्याभोवती चर खणून पाणी बाहेर काढा.
    • आवश्यक असल्यास झाडांवर बुरशीनाशकाची फवारणी करा..
  3. धान्य आणि भाजीपाला पिके:
    • पीक तयार असेल तर वेळीच काढणी करा.
    • काढलेले धान्य उघड्यावर न ठेवता सुरक्षित ठिकाणी साठवा.
  4. गहू आणि हरभरा पिके:
    • उशिरा झालेल्या पावसामुळे दाणे कुजण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळीच उपाययोजना करा.
    • पीक वाळवण्यासाठी योग्य जागी मांडणी करा..
  5. शेती उपयोगी साधनसामग्री:
    • ट्रॅक्टर, अवजारे, खते आणि बियाणे सुरक्षित ठिकाणी ठेवा.
    • विजेच्या खांबांपासून दूर राहा आणि वीज कोसळण्याच्या काळात काम टाळा.

निष्कर्ष:

अवकाळी पाऊस कधी कधी फायदेशीर ठरतो, परंतु त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. योग्य नियोजन आणि उपाययोजना केल्यास नुकसान कमी करता येते.